अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दौलत सरवणकर
- २३ जानेवारी २०२५ वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा फटकारे पक्षप्रमुख मा. श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, अंधेरी येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात आक्रमकतेने महायुती मधील बड्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आणि आपल्या भाषणा त स्पष्टपणे मांडलेले महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
भुजबळ अटक करायला निघाले होते तेंव्हा अडवाणी उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. शिवसेनाप्रमुखांना अटक झाल्यास राज्यात आगडोंब उसळेल, बंदोबस्त करायला राखीव दल केंद्र सरकारने पाठवलं होतं. हे तुमच बाळासाहेबांबद्दल प्रेम? सालटी काढायची म्हंटल तर खुप काढता येतील. तुम्हाला फिरण कठीण होईल. मारायला तुम्ही आणि सगळं झाल्यावर मिरवायला आम्ही असे आम्ही नाही
मी पुन्हा जिद्दीने उभा आहे लढतोय ते तुमच्या ताकदीवर आणि तुमच्यासाठी वामनराव महाडिकांच्या भाषेत विकली जाते ती विष्ठा आणि राहते ती निष्ठा निष्ठावंत माझ्यासोबत आहेत सगळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले देखील मंत्री म्हणून बसलेत आणि त्यांच्या जोरावर अमित शाह म्हणतात बीस फूट नीच गाडा है, जितकी खोल मुळ जातील तितकं वरती काय उगवतं ते तुम्ही पहा भाजपच हिंदुत्व गोमुत्रधारी
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे २०१४ साली शेवटचे दोन दिवस राहिले असताना बेसावध आहे पाहुन त्यांनी युती तोडली. मग तेंव्हा आम्ही कोण होतो प्रबोधनकारांचा नातु आणि हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा हिंदुत्व सोडू शकेल मोहन भागवत मशिदीत जाऊन बसतात, मोदीजी इथे आले, पोळ्या लाटुन गेले एक काय ते सांगा मी देशासाठी शहीद झाला त्या औरंगजेबाबद्दल बोललो होतो, तो औरंगजेब वेगळा आणि हा देशप्रेमी औरंगजेब वेगळा आम्ही हिंदुच आहोत, आम्ही ‘जय श्रीराम’ बोलुच पण तुम्हाला देखील ‘जय शिवराय, जय भवानी’ बोलावच लागेल
आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर मोदी काय आणि अजुन कोणी काय, ‘जय श्रीराम’ बोलु शकले नसते
शिवसेनेने विलेपार्ले येथे हिंदुत्वावर पहिली निवडणूक लढली तेंव्हा रमेश प्रभू जिंकले. ती निवडणूक शिवसेना वि. काँगेस अशी दुहेरी नह्वती, तिहेरी होती. भाजपने जनता पक्षाच्या प्राणलाल व्होरांना पाठिंबा दिला होता. तेंव्हा का तुम्हीं हिंदु म्हणून सोबत आला नाहीत? त्यानंतर तुम्हीं मातोश्रीचे उंबरठे झिजवायला लागलात
बाबरीच्या नावाने माहोल पेटवला आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यावर ‘आम्ही नाही त्यातले.’ ही अशी तुमची नामर्दांची अवलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकु? हिंदुहृदयसम्राटांवर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी केली, तो निर्णय अंमलात आणला तेंव्हा काँग्रेसचं सरकार नव्हत, अटलबिहारी वाजपेयींच सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांच प्रेम शिकवता?
शिवसेनाप्रमुखांचे भाषण आहे, आम्हाला मुसलमानांच वावड नाही. जर तो पाकधार्जिण असेल, देशद्रोही असेल तर तो हिंदु असेल कुरुडकरसारखा तरी तो आमचा नाही. इतक सरळ आणि स्पष्ट आहे
बाबरी पाडली, ‘इट वॉज अ टेरिबल मिस्टेक’ असे वाजपेयी म्हणाले होते
माफी उद्धव ठाकरेंनी नाही, माफी अटलबिहारी वाजपेयींनी मागितली होती
नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंनी नाही मोदींनी खाल्ला होता
आजुबाजुला मुस्लिम कुटुंब रहायचे, त्यांच्याघरून ईदला जेवायचं यायचं हे उद्धव ठाकरे नाही, मोदी म्हणाले होते.
मोहन भागवत मशिदीत गेले होते, उद्धव ठाकरे नव्हते गेले महायुती च्या सर्वच नेत्यांना परखड भाषण शैलीतून ठणकावून सांगितले.
