प्रतिनिधी – सखाराम कुलकर्णी : नांदेड -केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एक एप्रिल २०१९ च्या अगोदरच्या वाहनांना बसवण्याचा आदेश दिला. या नंतर दराबाबत उलट सुलट बोलले जाते. पण दुसऱ्या राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र शासनाने या ,नंबर प्लेट चे दर कमी ठेवले असून दराचा विचार न करता प्रत्येक वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावून घ्यावी. या नंबर प्लेटमुळे आपले वाहन सुरक्षित राहील. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.
केंद्र शासनाने देशातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल २०१९ नंतर घेतलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावलेल्या आहेत. या नंबर प्लेट लावल्याशिवाय वाहन रस्त्यावर येत नाही. तर या अगोदरच्या वाहनांना नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकार विनाकारण भुर्दंड पाडत आहे व इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यात ह्या नंबर प्लेटचे दरही जास्त आहेत अशी चर्चा काही संघटना व जनमानसात होत आहे .यावर नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे म्हणाले दुसऱ्या राज्यापेक्षा आपल्या राज्यातील दर कमी आहेत .दोन चाकी वाहनासाठी ५३१ रुपये ,तीन चाकी साठी ५९० रुपये व चार चाकी व पुढील चाकासाठी ८७९ रुपये दर असून जीएसटी व फीटींग सह हे दर आहेत. तरीपण दराचा विचार न करता आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी या सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे फार उपयुक्त आहे. वाहन चोरीस गेले तर ही नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट लावता येत नाही, ही नंबर प्लेट सहजासहजी निघत नसून तुटून जाईल. विना नंबर प्लेट वाहन पकडले जाते. दुसरी नंबर प्लेट लावली तरी वाहन पकडले जाते व शासन बसवते अशी नंबर प्लेट बनवता येत नाही. या नंबर प्लेटमध्ये सिक्रेट कोड ईमबॉसिंग असून रंग वेगले व गाडीचा पूर्ण डाटा या नंबर प्लेट वरून समजून जातो. वाहन चोरीला गेल्या वर वाहनाची रक्कम मिळण्यास आपण विमा काढतो त्याप्रमाणेच विमा पेक्षा कमी दारात या नंबर प्लेट आहेत. ह्या नंबर प्लेटमुळे वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण नगण्य राहील. अवेद्य धंदे कमी होतील .वाहनाचे गैरवापर कमी होईल. असे अहिरे यांनी सांगितले. शासकीय वाहनांवर नंबर प्लेट बाबत हे म्हणाले प्रत्येक शासकीय विभागाने आपली जिम्मेदारी समजून शासकीय वाहनांना सेक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात. काही शासकीय वाहन भाडेतत्त्वावर घेतली असतील व २०१९ नंतरचे असतील पण त्यांना सेक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर त्यांनी पण सेक्युरिटी नंबर भेट बसवून घ्याव्यात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यास नोंदणी चालू झाली असून जिल्ह्यात १२ केंद्र आहेत. तरी वाहनधारकांनी शेवटच्या दिवसाची म्हणजे ३० एप्रिल ३०२५ ची वाट न पाहता आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी या नंबर प्लेट लवकरच लावून घ्याव्यात. असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी केले आहे.
