समाज परिवर्तनाची गरज – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत
प्रतिनिधी गणेश राऊत
कोंढवे धावडे – समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस फार अर्पण करत विनम्र अभिवादनाने संत गाडगेबाबा जयंती साजरी केली..*
*या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते..*
*या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग गायकवाड, श्रीकांत धावडे, शिवाजी धावडे, प्रशांत महाजन, कपिल पाटील, आदित्य वाकडकर व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..*
*समाज परिवर्तन घडवण्यासाठी लोकशिक्षणाचे महत्त्व जाणून संत गाडगेबाबा महाराज यांनी आयुष्यभर साक्षरतेचा प्रचार प्रसार केला, समाजातून अज्ञान अंधश्रद्धा व स्वच्छतेचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य केले आपल्या प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले समाजापुढे त्यांनी आपल्या श्रमाचा आदर्श ठेवला कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणारे समाज सुधारक संत गाडगेबाबा हे खरंच महान संतच सर खरे समाजसुधारक होते माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे ही शिकवण देणारे संत गाडगेबाबा आहे असे मत यावेळी साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले..
संस्थेच्या वतीने प्रशांत मस्के यांनी आभार व्यक्त केले.
