अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संभाजी पुरीगोसावी : बीड जिल्हा पोलीस दलात तुम्ही सांगाल, त्या ठाणेदारांच्या तात्काळ बदल्या करणार… खांदेपालट चालूच राहणार :- पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची ठाम भूमिका, संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी. खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती, या घटनेचे प्रडसाद विधानसभेत हे चांगलेच उमटले होते, याच पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करीत बीड जिल्ह्याला अवघ्या 24 तासांत नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली होती, मस्साजोग प्रकरणामुळे बीडचे नाव हे राज्यभर चांगलेच चर्चेत आले होते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ॲक्शन घेत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती, आणि धडाकेबाज आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नवनीत कॉवत यांना बीड जिल्ह्यासाठी पसंती देण्यात आली, नव्या पोलीस अधीक्षकांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सरळ झाला आहे, तरी देखील महाराष्ट्रांच्या डायरीमध्ये आता बीड जिल्हा हा संवेदनशील, जिल्हा म्हणून आता चांगलाच ओळखला जातोय, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पदभार घेतल्यापासून बीड जिल्हा पोलिस दलात देखील अनेक ठाणेदारांच्या खांदेपालट देखील केल्या, तर काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा देखील त्यांनी उगारला आहे, त्यामुळे बीड जिल्हा पोलीस दलात आता ठाणेदारांसह पोलीस कर्मचारी देखील ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे नवनीत कॉवत यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगलाच सरळ होणार असा सवाल आता बीड जिल्हा वासियामधून उमटत आहे.
