मला कामात दिरंगाई नको, चंद्रपूरच्या नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना संदेश!
अनुजा कारखेले-देवरे मॅडम प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सौ. वसुमना पंत यांनी 3 एप्रिल 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. मावळते जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडून अधिकृतपणे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्या चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच त्या महिला जिल्हाधिकारी म्हणून लाभल्या आहेत. सन 2017 बॅचच्या त्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक जिल्ह्यात विविध पदावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. तसेच प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या आणि शिस्तप्रिय कार्यक्षम महिला अधिकारी म्हणून त्यांना महसूल प्रशासनात चांगलेच ओळखले जाते. शासनाच्या या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासनाला आता नवे नेतृत्व मिळणार असून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या इतिहासांत प्रथमच महिला अधिकारी म्हणून धुरा सांभाळणार असल्याने हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांना नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत होत्या. त्यांच्या इंट्रीमुळे आता चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या माध्यमांतून सर्वसामान्यांच्या आणि अडचणीसाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ऑफिसचा दरवाजा कायम खुला असणार आहे. यावेळी त्यांनी पदभार घेताच आपल्या कार्यालयातील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना देखील मला कामात दिरंगाई नको, असा संदेश दिला आहे.*








