नारायणगांव पोलिसांची दमदार कामगिरी; नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोध घेवुन मुळ मालकांना परत:- स.पो.नि . प्रविण संपांगे
पुणे जिल्हा रणजित मस्के प्रतिनिधी
नारायणगांव पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता आणि कार्यक्षमता दाखवत नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेवुन ते मूळ मालकांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी नारायणगांव पोलिसांनी केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांने विशेष मोहीम राबवून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे अनेक मोबाईल शोधण्यात यश आले.
या कारवाईदरम्यान विविध ठिकाणांहून गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा मागोवा घेत त्यांची ओळख पटवण्यात आली आणि संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी नारायणगांव पोलिसांचे आभार मानले.
याबाबत बोलताना स.पो.नि. प्रविण संपांगे यांनी सांगितले की, “नागरिकांची मालमत्ता सुरक्षित ठेवणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. हरवलेले मोबाईल शोधून परत देणे ही आमची सेवा असून भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील.”
नारायणगांव पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे आणि पोलीस ठाण्याकडील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.








