एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुरीगोसावी कुटुंबाचा आधारस्तंभ आणि खमक्या नेतृत्व म्हणून तात्यांची ओळख होती

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी (सातारा)

पुरीगोसावी कुटुंबाचा आधारस्तंभ आणि खमक्या नेतृत्व म्हणून तात्यांची ओळख होती :- संभाजी पुरीगोसावी. प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र आणि सातारा करंजे येथील श्री.काल भैरवनाथाच्या नगरीत वास्तव्यास असणारे कै. रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (तात्या ) यांचे मागील दोन महिन्यांपूर्वी हृदयविकारांच्या तीव्र धक्क्यांने दुःखदायक निधन झाले, त्यांच्या अचानक जाण्यांने संपूर्ण कुटुंब आणि गावातून देखील तसेच जागरण गोंधळ या धार्मिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तात्यांची कुटुंबात एक आधारस्तंभ आणि खमक्या नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, त्यांचा जीवन प्रवास, हा अतिशय प्रेमळ आणि शांत प्रिय राहिला, रिक्षा व्यवसाय तसेच जागरण गोंधळ यासारख्या धार्मिक कार्यक्रमांतून आपली एक वेगळी ओळख त्यांनी सातारा जिल्ह्यासह मुंबई पर्यंत देखील त्यांचा दांडगा जनसंपर्क होता, गावाकडे त्यांना रामभाऊ सातारवाला अशी त्यांची ओळख होती, आपल्या जीवनात अनेक माणसं त्यांनी जोडली, कुटुंबामध्ये लग्न सोहळे धार्मिंक कार्यक्रम तसेच कुटुंबातील काही महत्त्वाच्या अशी सर्व कामे ही तात्यांच्या मार्गदर्शनाखाली कायम होते, तात्यांनी आपल्या कुटुंबाचा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तात्या केवळ कुटुंबाचे प्रमुख नव्हते, तर संपूर्ण कुटुंबाचे एकतेचे प्रतीक होते, आपल्या पत्नीसह तीन मुलांसह मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रेमाने सांभाळली होती, त्यांच्या शब्दांला कुटुंबातील सर्व सदस्यांनी कायमच मान दिला होता,अकाली जाणे हे कुटुंबासाठी आणि समाजासाला देखील मोठा धक्का बसला आहे,कुटुंबातील सर्वांसोबत ( तात्या ) हे मित्राप्रमाणे राहिले, सर्वांच्या ते (तात्या) या नावाने चांगलेच परिचयात होते, तात्या कुटुंबामध्ये कधीच नात्याप्रमाणे राहिले नाहीत सर्वांना नेहमीच ते सांभाळून आणि हसून खेळून राहायचे, अतिशय त्यांचा अत्यंत प्रेमळ आणि शांतप्रिय स्वभाव कायम होता, तात्यांची उणीव ही आमच्या कुटुंबाला नेहमीच भासणार आहे, दिपावलीच्या सणासुदीमध्ये तात्या आमचा निरोप घेतील असे कधीच वाटले नव्हते, त्याहून आमच्या मोठ्या कुटुंबाला तात्या हवेसे होते, पण असे म्हणता ना, की चांगली माणसं सर्वांना आवडतात, तीच माणसं देवाला सुद्धा आवडतात, जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला, तात्यांची आठवण ही कुटुंबालाच नव्हे तर त्यांच्या जनसंपर्कातील लोकांना कायमच होत आहे, तशी तात्यांनी आपली एक वेगळी छाप पाडली होती, तात्यांच्या जाण्यांमुळे आज आमच्या पुरीगोसावी कुटुंबाचा एक आधारस्तंभ आणि कुटुंबाचा खमक्या गेल्याची भावना मी व्यक्त करतो, तात्या बद्दल बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील असे त्यांचे आमच्यासाठी नेतृत्व होते, तात्यांच्या पश्चांत पत्नी तीन मुलै सुना नातवंडे भाऊ भावजय बहिण पुतणे मुलगी जावई नातू असा परिवार आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link