अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव
नाव :- साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत
शिक्षण :- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल
सामाजिक कार्याचा अनुभव:- पंचवीस वर्षे
पद:- अखिल भारतीय छावा संघटना महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता
ग्लोबल ह्यूमन राइट्स पुणे जिल्हा प्रेसिडेंट
पत्ता :- कोंढवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे
संपर्क :-9130724727
जो करतो निस्वार्थ समाजाची सेवा, त्याला मिळतो कर्मरूपी मेवा.
जर असतील कर्म चांगली तर भगवंतालाही वाटतो हेवा.
आणि समाजातील लोकांना वाटते याला कर्मरुपी आशीर्वाद द्यायलाच हवा.
कोंढवे धावडे:- कोंढवे धावडे गावाचा सुपुत्र आणि पंचक्रोशीतील पहिला साहित्यरत्न, गेली सव्वाशे वर्ष कोंढवे धावडे गावात वास्तव वडील कै.विठ्ठल रंगू राऊत (सुतार) हे सुतार काम करून या गावांमध्ये उदरनिर्वाह करत होते गावामध्ये सुताराचे एकच घर होते वडिलांच्या कामामुळे पंचक्रोशीत वडिलांना सर्वजण भाऊजी या नावाने ओळखत होते. विश्वकर्मीय पांचाळ सुतार समाजातील सामान्य कुटुंबात जन्म सात बहिणी एक मोठा भाऊ सर्वात लहान शेंडेफळ म्हणून जगण्यासाठीचा संघर्ष शालेय जीवनात अत्यंत हुशार आणि कोंढवे धावडे गावातील पहिला आदर्श विद्यार्थी. शाळेत कधीही पहिला नंबर सोडला नाही शालेय जीवनात अव्वल असल्यामुळे लहानपणापासूनच वकृत्व नेतृत्व आणि कर्तुत्व हे गुण लाभले लहानपणापासूनच संघर्ष करण्याची सवय लागली दहावीनंतरच रात्रीचे काम आणि सकाळची शाळा ही सुरुवात बारावीनंतर काम करून शिक्षण त्यानंतर डिप्लोमा पूर्ण करत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे शिक्षण पूर्ण केले व त्या शिक्षणाच्या जोरावर फॉरेन रिटर्न होता आलं..*
*खऱ्या अर्थाने आई वडील गेल्यानंतर खडतर आयुष्याला सुरुवात झाली कसलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, नाही कोणाची साथ होती आई वडील सोडले तर कोणाचाही पाठीवरती हात नव्हता आयुष्य म्हणजे संघर्षमय कहानीच होती आई कैलासवासी पारूबाई विठ्ठल राऊत यांनी वडिलांची कीर्ती मोठी आहे नाव मोठा आहे त्या नावाला तू मोठं कर आणि आज तुला बापाच्या नावाने ओळखले जातआहे भविष्यात बापाला तुझ्या नावाने ओळखले जाईल असं मला वचन दे असं आजारी असताना माझ्याकडून वचन घेतलं गेलं तिला दिलेलं वचन पूर्ण करण्याचा मी चंग बांधला आणि ती गोष्ट सत्यात उतरवली पण माझं हे कर्तुत्व पाहिला माझे आई-बाबा राहिले नाही याची सल आजपर्यंत भासत आहे वडिलांनंतर आई ही मला सोडून गेली अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंब सांभाळत असताना सामाजिक क्षेत्रात गरिबीमुळे पाऊल त्यासाठी गेली 25 वर्ष निस्वार्थ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी, अनेक दिव्यांग अपंग गरीब सामान्य जनतेसाठी काम केले कर्म हीच त्याची मिळालेली पावती कोणी मदत करू न करू कुठलेही कार्य पूर्णत्वास नेण्याची धमक लहानपणापासून आर्मीमध्ये जायची इच्छा ती पूर्ण न झाल्यामुळे निराश न होता देश सेवा कशी करता येऊ शकते म्हणून एक वेगळ कार्य हाती घेतलं आणि गेली पंधरा वर्षे ज्यांनी दिले बलिदान देशासाठी चला एक दिवा लावू शहिदांसाठी ही सेवा हाती घेत आज तागायत ती करत आहे.
तसेच निस्वार्थ सामाजिक कार्य त्यामध्ये गरीब दिव्यांग यांच्यासाठी योगदान, दिव्यांग मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेत त्यांना मदत करण्याचे कार्य, गोरगरीब लोकांच्या अडचणी समजून घेत त्या लोकांसाठी मदतीच कार्य, रोडवरील भिकारी लोकांना थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लॅंकेट वाटप, प्रत्येक महात्म्यांच्या जयंती आणि स्मृतिदिन वारसा टिकावा म्हणून योगदान, तहानलेल्या वाटसरूनसाठी पाणीपोई,अनेक महिलांसाठी त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला सबलीकरणाचे कार्य, पंचक्रोशीतील प्रत्येक अडचणीसाठी , अनेक वृद्धाश्रमांना मदत करणं, वृद्धांच्या व्यथा समजून घेणे आणि त्यावर उपाययोजना यासाठीच काम, उद्योजक आणि उद्योजिका घडवण्याचा कार्य, आरोग्यविषयक कार्य, कोरोना काळामध्ये अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी आरोग्य शिबिर, व जनजागृती करत खूप मोठे योगदान वाढदिवस साजरा न करता दिव्यांग अपंग व वाढदिवसादिनी अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन आणि त्यांना अभिवादनाचा कार्यक्रम करत आलो सामाजिक क्षेत्रात हिरारीने भाग घेणे जे इतरांना जमत नाही ती कार्य करणे आणि इतरांची प्रेरणा कशी बनता येईल यासाठीचा फक्त घेतला ध्यास..*
*या कार्यामुळे अनेक पुरस्कार ते म्हणजे समाज रत्न पुरस्कार व महाराष्ट्रातील नव्हे तर भोपाळ येथील सामाजिक क्षेत्रातील ग्लोबल अवार्ड, मदर तेरेसा अवार्ड, राष्ट्रसेवा अवॉर्ड, महाराष्ट्र रत्न अवार्ड, लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, राष्ट्रसेवा सन्मान अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..*
*गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्य करत असल्यामुळे त्या कार्याची दखल घेत सोशल डॉक्टरेट पदवीने सन्मानित तसेच साडेनऊशे कविता, त्यापैकी सव्वाशे कविता छत्रपती शिवराय व छत्रपती शंभुराजांवर केल्या तसेच वास्तववादी कवितेचा एक संच निर्माण केला अनेक दिग्गज व्यक्तींवरती शब्दांकन या सगळ्यांचा विचार करत नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये साहित्यरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आता करियर गायडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व उद्योजक घडवण्यासाठी धडपड मला कोणी घडवलं नाही पण एक स्वप्न उरी बाळगलेले आहे आपल्या पंचक्रोशीतील कमीत कमी एक हजार उद्योजक घडवणे हे आहे.
या कार्यामुळे उद्योजक पुणे जिल्हा अध्यक्ष ऑनलाइन पत्रकारिता पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच आदेश जनतेचा व ह्यूमन राईट पुणे जिल्हा प्रेसिडेंट म्हणून कार्य करत आहे, चांगले कार्य करणाऱ्यांना कोणीही साथ देत नाही खोटी आहे दुनिया इथे खोटीच लोक मोठी होणार लायक आहोत म्हणून एकटे आहोत नालायक असतो तर आजूबाजूला आमच्याही गर्दी दिसली असती साध्या माणसाचा कोणताही ब्रँड नसतो साधी माणसं माणुसकीचा ब्रँड असतात हे आजही लोकांना नाही दिसत आहे कोरोनाने लोकांना लायकी दाखवून दिली आहे अरे बाबा तू पाहून आहे यापूर्वी तलावाचा तर ही लोकांचे डोळे आजही उघडलेले दिसत नाही जो तो स्वतःला मालक समजत आहे कोणतीही कामगिरी बजावताना कधीच कोणाशी स्पर्धा व तुलना केली नाही कोणाचा तिरस्कारही केला नाही जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी आणि अस्तित्व हे वडिलांनी केलेल्या कष्टापाई त्यांची निष्ठा म्हणून कार्य करत आलो आहे.. गरीब सामान्य जनतेच्या मदतीसाठी 24/7 त्यांच्या मदतीसाठी आजपर्यंत उभा राहिलो आहे, गरीब कुटुंबातील लोकांना हॉस्पिटल साठी पुढाकार घेऊन हॉस्पिटल बिल माफ करणे, कोंढवे धावडे गावात पहिली माणुसकीची भिंत तसेच छत्रपती शिवराय वाचनालय चालू केले, समाजामध्ये देणारे भरपूर लोक आहेत परंतु दिलेली मदत ही खरोखरच गरजू व्यक्तीपर्यंत मिळत नाही ती जातही नाही हे काम प्रमाणिकपणे आजपर्यंत करत आलो आहे.
*निस्वार्थ सामाजिक कार्य करणं आणि त्याची सामाजिक बांधिलकी जपणं संत गाडगेबाबाच्या विचाराने छत्रपती शिवरायांच्या आचरणाने आणि छत्रपती शंभूराजांच्या प्रेरणेने आजपर्यंत कार्य करत आहे सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना वेगवेगळ्या अनुभव अनेक अडचणी आल्या परंतु विचारांची ढाल सोबत असल्यामुळे त्यांच्याबरोबर संघर्षाची लढाई करत एक ही लढाई न हरता माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे ही प्रेरणा लोकांना देत अनेकांना मदत करत सामाजिक सेवेमध्ये आपल्या कुटुंबाचा विचार न करता वाहून दिलं त्याच्या पाठीमागे माझी सहचरणी सौ अमिता राऊत हिचा खूप मोठा त्याग आहे ती पाठीशी खंबीरपणे उभी राहिली
तिने स्वतः खूप मोठा त्याग करत मला आणि माझी मुलगी प्रचिती हिला घडवण्यामध्ये लाखमोलाच सहकार्य केलं मुलगी प्रचिती हिला शिवव्याख्याती बनविली प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष असतो असं म्हटलं जातं पण एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते हे माझ्या पत्नीने दाखवत माझीच प्रेरणा बनली म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. आणि त्यामुळेच जनतेने आपल्या विभागातील पहिला जनसेवक ही पदवी बहाल केली तसेच छत्रपती शिवराय छत्रपती शंभुराजे यांचा वारसा टीकवत त्यांच्या बलिदानाची व्यथा जनतेला सांगत जसं देश धरम पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था या विचाराने प्रेरित होत अनेकांची प्रेरणा माझ्यासारख्या सुतार समाजातील मुलाला बनता आलं याचा गर्वच नाही तर अभिमान आहे आयुष्यात कधीही स्वाभिमानाला कुठे घाण टाकलं नाही पद आणि प्रतिष्ठेच्या मागे कधीही धावलो नाही स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचं ही एक मात्र इच्छा होती आणि आपली स्वतःची पत असावी या विचारांची माझी स्वतःची धारा होती मी देणं लागतो या महाराष्ट्राच्या मातीचा हे ध्येय होतं आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र शिवबांचा छावा याच नावाने ओळखत आहे..
ज्या पद्धतीने गेले पंचवीस वर्ष निस्वार्थ समाजकार्य करत आलो आहे त्या समाजकार्याला जनतेने ओळखले पाहिजे राजकारण करणे सोपे आहे पण समाजकार्य करणे राजकारणाच्या कितीतरी पटीने अवघड आहे त्यामुळे समाजातील जनतेने निस्वार्थ कार्य सामाजिक बांधिलकी स्वाभिमानी बाणा असलेल्या व्यक्तींच्या पाठीशी राहणं आणि त्यांना बळ देणं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगणं या कलियुगामध्ये खूप गरजेचं वाटतं..
गरिबीने समाजाची जान शिकवली सामाजिक बांधिलकी शिकवली आणि समाजाचं ऋण फेडण्याची ताकद दिली त्याबद्दल मला जन्म दिलेल्या आई-वडिलांचं आणि आई जगदंबेच आई जिजाऊंचं मी मनस्वी आभार मानतो…
शेवटचा एकच सांगेन जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत निस्वार्थ समाजाची सेवा करेल..
आपला साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत (शिवबांचां छावा)
