अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव. नागपूर /चक्रधर मेश्राम, दि. ४/१/२०२५:- RSS ,भाजप , मोहन भागवत , मोदी ,शहा , आणि सोबतीला हतबल असलेल्या राजकीय पक्षांनो. …
देशातील मनुवादी विचाराने , पुरोगामी महाराष्ट्राने ( संविधान विरोधी ) सर्व संविधानिक संस्था वेठीस धरून भारतीय जनतेवर EVM द्वारे जे प्रयत्न करून त्या जनतेच्या मतांचा हक्क जो हिरावून घेतलेला आहे. त्या विरोधात रान उठविण्याची नांदेडनंतर आता औरंगाबाद मध्ये पंडित गायकवाड सर, धनंजय बोर्डे सर, भिमराव गाडेकर सर, जितेंद्र भवरे सर आणि इतर सहकाऱ्यांनी ही दुसरी ठिणगी पाडली आहे. अशाच ठीणग्या पाडत ..पाडत सर्व मनसूब्यांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देशातील जनतेची नितांत गरज आहे . कारण…EVM म्हणजे आधुनिक मनुस्मृती आहे
केंद्रातील भाजप आणि मित्रपक्षाचे सरकार चांगली कामे केलीत म्हणून ? तिसऱ्यांदा तुम्हाला आम्ही निवडून दिले का.?
600 दिवसापासून मणिपूर जळत आहे, परंतू प्रधानमंत्री तिथे अजूनही गेलेले नाहीत.
250 लाख कोटीचे कर्ज देशावर करण्यासाठी ?
65 अब्ज रुपये तुमच्या विदेश दौऱ्यात खर्च केला म्हणून.?
15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आले म्हणून.? महागाई नियंत्रणात येऊन बेरोजगारीला चालना मिळाली म्हणून ? 65 रुपयाचे पेट्रोल 110 रुपये झाले म्हणून ? 400 रुपयाचा गॅस 1000 रुपये झाला म्हणून? असे कितीतरी उदाहरणे देता येतील.
ज्यामुळे या NDA ला अर्थात मोदी – शहाला तिसऱ्यांदा जनतेने उत्स्फूर्तपाने निवडून दिले.म्हणून ठिनग्या, पाडत.. पाडत चिंगारी पेटवणार आहोत.असेजागृतीचे कृतिशील लेखक अनंत केरबाजी भवरे संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, यांनी आपले मत व्यक्त केले आहे..
