पालकमंत्री उदय सामंत | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गणेश तळेकर.
सर्व जाती-पंथांचा सन्मान करण्याची शिकवण; पुढच्या पिढीला स्मारक दीपस्तंभ – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या स्मारकाचे भूमिपुजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व जाती-पंथांचा सन्मान करण्याची शिकवण श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी दिली. ही शिकवण पुढच्या पिढीसाठी स्मारकाच्या माध्यमातून दीपस्तंभासारखी राहील, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
या कार्यक्रमप्रसंगी मुख्याधिकारी तुषार बाबर, अखिल भारतीय भंडारी समाज अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, तालुका आध्यक्ष राजीव कीर, बाबू म्हाप, राजन शेट्ये, कुमार शेट्ये, पणतु अशिष कीर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, श्रीमान भागोजीशेठ कीर आणि संत गाडगे महाराज यांचे पुतळे उभे करण्याचे आम्ही उद्दीष्ट ठेवले होते. ही स्मारकं पुढच्या पिढीला दीपस्तंभासारखी उभी राहतील. सर्व जाती-धर्माच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमाला बोलवून त्यांचा सन्मान केला. सर्व जाती-पंथांनी बनलेले हे शहर एकोप्याने नांदत आहे. हा समतेचा विचार मुंबईपर्यंत पोहचला. श्रीमान भागोजीरावशेठ यांची हीच शिकवण पुढच्या पिढीसमोर रहावी, असेही ते म्हणाले.
यावेळी राजीव कीर यांनी प्रास्ताविक केले. श्री. बांदीवडेकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
