ठाणे/कल्याण | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | जिल्हा प्रतिनिधी : गणेश दळवी.
कल्याण ग्रामीण मतदार संघातील ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत आमटी खायला दिल्याने शाळेतील तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. भात आणि आंबलेली मटकीची आमटी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.
कळव्यातील सह्याद्री परिसरात सहकार विद्याप्रसारक मंडळाची खासगी शाळा आहे. या शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार दिला जातो. मात्र याच पोषण आहारामधून शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. आहारात मुखत्वे करुन खिचडी दिली जाते. याच खिचडीतून 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आलं होतं. मात्र या प्रकरणी आता ठेकेदारांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेकडून महापालिकेच्या शाळेला सकसआहार म्हणून खिचडी देण्यात येते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत की, अनेक शाळेमध्ये खिचडीतून मुलांना विषबाधा होते. खिचडीची कोणतीही क्वालिटी तपासली जात नाही आणि या मुलांना ही खिचडी देण्यात येते.
या खिचडीतून आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी देण्यात आली. त्यात पाल असल्याचे आढळून आले आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या 40 पोरांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. याची तात्काळ सूचना ही महापालिकेच्या अधिकाऱ्याने देण्यात आली व महापालिकेकडून डॉक्टरांची टीम ही शाळेत रवाना झाली. अनेक मुलांना उलटीचा त्रास जाणवत आहे, परंतु अशा या खिचडी देणाऱ्या ठेकेदारावर महापालिकेने तात्काळ कारवाई करावी जेणेकरून या लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना सक्त अशी शिक्षा झाली पाहिजे.गेल्या दोन महिन्यात दिवा विभागात अनेक घटना घडल्या आहेत. साबेगावातअशीच घटना घडली होती बी. आर. नगर मध्ये पण अशाच प्रकारच्या घटना या वारंवार विभागात घडत आहेत तरी तातडीने या खिचडी देणाऱ्या ठेकेदार काते मॅडम यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.
