स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने ” शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा- २०२६.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
अहिल्यानगर – लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती निमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी दिली.
ही स्पर्धा इयत्ता ६ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे
१) *छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आजची पिढी*
२) *माझे आराध्य : छत्रपती शिवाजी महाराज*
३) *शिवाजी महाराज आज असते तर*
असे निबंध स्पर्धेसाठी विषय आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येईल.

स्पर्धकांनी निबंध १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत
*पियूष फोटो स्टुडिओ, १०६३, शिवाजी चौक, भिंगार, अहिल्यानगर – 414002* या पत्त्यावर स्वतः किंवा पोस्टाने / कुरिअर ने पाठवायचे आहेत. अधिक माहिती साठी *8793 191919* या क्रमांकावर संपर्क साधावा. मागील विजेते स्पर्धकांना सहभाग घेता येणार नाही.
विद्यार्थांनी निबंध शाळेत लिहून त्यावर वर्गशिक्षकांची स्वाक्षरी घ्यावी. स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.








