108 चा फसवा भरोसा – गरीबाच्या मृत्यूला जबाबदार कोण? व्यवस्थेवर उभं राहिलं प्रचंड प्रश्नचिन्ह!
श्री. मनोज उराडे
जिल्हा प्रतिनिधी – अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली
कुरखेडा (ता. ५ ऑगस्ट २०२५):
“मी सगळं करून पाहिलं… फोन, धावपळ, याचना – पण वेळेवर फक्त मृत्यूच आला!” – ही वेदनादायी प्रतिक्रिया आहे **अप्रव पुरंदर भैसारे** यांची. त्यांच्या कुटुंबातील सदस्य प्रमिला श्यामराव भैसारे यांचा दुर्दैवी मृत्यू केवळ आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात ही घटना घडली असून, संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एकाकी झगडणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्यांसमोर त्याच्या प्रिय व्यक्तीचा जीव जातो, आणि त्याला मदतीच्या नावाने फक्त ‘प्रशासनाची पाठ फिरवलेली पाठ’ दिसते – ही वस्तुस्थिती आज आपल्यासमोर आहे.
“108” वर कॉल… पण रुग्णवाहिकेऐवजी आली निराशा
४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान प्रमिला श्यामराव भैसारे यांची तब्येत अचानक बिघडली. त्यावर त्वरित 108 क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. कोरची येथून “एका तासात गाडी पोहोचेल,” असे सांगण्यात आले. तात्काळ सेवा देण्याऐवजी चुकीचा सल्ला आणि दिलेला ड्रायव्हरचा फोन बंद होता.अखेर खासगी वाहनाने त्यांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथून गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र तिथेही 108 सेवा अनुपलब्धच होती. “102 गाडी हवी असेल, तर 2400 रुपये द्या” अशी मागणी रुग्णालय कर्मचाऱ्यांनी केली – जणू जीव वाचवणे हेही आता खरेदी करण्याचे प्रकरण झाले आहे! त्यानंतर काही तासांतच, ५ ऑगस्ट रोजी सकाळी प्रमिला भैसारे यांचे दुःखद निधन झाले.
न्याय मागणारा तरुण – बेपर्वा यंत्रणा-
अप्रव भैसारे यांनी आपल्या आजारी नातेवाइकासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण जेव्हा यंत्रणा असंवेदनशील, असंवधान आणि भ्रष्ट असते – तेव्हा सामान्य माणसाचे प्रयत्न अपुरे ठरतात.
सरकारी सेवा, आपत्कालीन सुविधा, आणि “मोफत” आरोग्य हक्क यांची बिनधास्त पायमल्ली ही आजची कठोर वास्तवता आहे.
*प्रश्न – जे प्रत्येक नागरिकाने विचारलेच पाहिजेत:*
🔹 108 सेवा वेळेवर पोहोचत नसेल, तर ती सेवा चालूच कशासाठी ठेवली आहे?
🔹 रुग्ण वाहतूक सेवेसाठी पैशांची उघड मागणी करणं – हे कायदेशीर आहे का?
🔹 गरीबांसाठी असलेली मोफत आपत्कालीन सेवा – कागदापुरतीच का राहते आहे?
*तक्रार दाखल – चौकशीची मागणी*
या घटनेबाबत उपसरपंच भैसारे यांनी तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी कुरखेडा यांच्याशी तोंडी तक्रार करत त्यांनी आमच्या कडे 102 गाडीची जिम्मेदारी आहे, 108 ची तक्रार साठी आपण तालुका अधीक्षक यांच्या सोबत चर्चा करा म्हणले परंतु त्या वेळी तालुका अधीक्षक अनुउपस्थित असल्याने दुसऱ्या दिवसी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे लेखी तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाई, अपुऱ्या आपत्कालीन सेवांची पुनर्रचना आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना, 102 आणि 108 गाडीवर स्पष्ट उल्लेख करण्याची मागणी केली आहे. “मी एक माणूस वाचवू शकलो नाही – कारण यंत्रणेला काहीच फरक पडत नव्हता. माझी तडफड त्यांच्या नियमांआड दडपली गेली…” – उपसरपंच अप्रव भैसारे यांचा हा संतप्त स्वर आता संपूर्ण जनतेचा आवाज बनत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाच्या दुःखाची कहाणी नाही – ही संपूर्ण व्यवस्थेवरचा आरोप आहे. जर प्रशासनाने जागरूकता आणि जबाबदारी घेतली नाही, तर अशा ‘प्रशासनघातकी मृत्यू’ पुनःपुन्हा घडत राहतील.
“आता थांबा!” म्हणण्याची वेळ आली आहे – अन्यथा ही व्यवस्था जीव घेते, आणि मूक बनते.
