सायकल स्वारीतून समाज प्रबोधनाचा शिवसंकल्प
परभणीतील सायकलस्वार संदिप गव्हाणे-पाटील यांचा उपक्रम
प्रतिनीधी गोपाळ भालेराव
शिवभक्त मावळे आपआपल्या परिने शिवछञपतींच्या प्रती आपली संवेदना कृतज्ञता व्यक्त करीत असतात.कुणी पायी तर कुणी एक प्रण मनाचा करुन शिवछञपतींना अभिवादन करत असते.अशाच अगणिक शिवभक्त मावळ्यांपैकी एक आधुनिक काळातील शिवछञपतींचे अनुयायी परभणीचे संदिप गव्हाणे पाटील दरवर्षी प्रमाने शिवरायांना सायकलवर रायगडला शिवराज्याभिषेकाला जात असतांना गतवर्षी अपघातग्रस्त झाले होते.पण कडव्या मनाचा निश्चय थांबला नाही.पुन्हा या वर्षी प्रवासवारी सपत्निक केली.पुन्हा थांबलेला संकल्प पुर्ण करण्याशी महाराजांकडून शुभआशिषाचे पाठबळ मागितले.पुढच्या वर्षी पूर्ववत करायची असे मनाशी दृढनिश्चयी ठरवले आहे.संदिप गव्हाणे यांचा प्रवास साधा सामान्य नाही .संघर्षाची पाऊलवाट आदर्श आहे.
संदिप गव्हाणे मराठा योध्दा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास सायकलनेच प्रवास करत वाटेत गावो-गावी “मराठा आरक्षण गरज जानिव जागृती” करत .उपोषण -सभा स्थळी पोहचतात.तसेच शिवराज्याभिषेकाचे महत्व ते लोकांना वाटेत पटवून देतात.त्यांनी सलग चार वर्षे सायकल वारी रायगडच्या द्वारी केलेली आहे.शिवाय स्वच्छता, गडसंवर्धन शिवछञपतींचे शिवविचार इतिहास काळाची गरज पटवून देत असतात.इतिहास, इंधन बचत आणि पर्यावरणाची आवड असनारे संदिप गव्हाणे यांना छ.शिवाजी महाराजांबद्दल अंत्यत प्रेम आणि आदर असल्याने त्यांनी गडकोटाची संवर्धन जानिव जागृतीसाठी नविन मोहिम काढून राज्य सरकारने गडांचे संवर्धन करावे यासाठी “नवी जानिव जागृती अभियान” राबवनार आहेत.आणि समाजमन त्याबाबत तयार करनार आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट यांच्याबद्दल विशेष स्नेह असल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांची मातोश्रीवर सायकल वारीतूनच भेट घेतल्याने अनेक नेत्यांच्या सदिच्छा त्या वेळी त्यांना मिळाल्या होत्या.ठाकरे कुटुंबाशी विशेष स्नेह गव्हाणेंचा आहे.तिन्ही पिढ्यांशी त्यांची नाळ अतुट राहिली आहे. राम मंदिर आयोध्या सायकल वारीचे स्वप्न पुढील नियोजित संकल्पित लवकरच वास्तवात पुर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. सर्वोच्च श्रेष्ठ राजाच्या ईश्वांकु वंश कुळातील प्रभु रामांचा आदर्श नव्या भारताला उभारणीसाठी गरजेचा आहे म्हनून ते सायकल वारीतून आयोध्या परिक्रमा करनार आहेत.
मराठा संघर्षेयोध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मुंबई वारी वेळी त्यांनी ४ दिवसात परभणी -माजलगाव नगर पाथर्डी-देहू- शिवतीर्थ असा प्रवास केला होता.सर्व समाज बांधवानी गावोगावी स्वागत केले होते.दररोज १५०-१२५किमी अंतर सहज कापतात.नारायणगड महासभा ,दसरा मेळावा,अंतरवाली सराटी महासभा त्यांनी सायकल वारीतून मराठा आरक्षण जागृती व सामाजिक एकोपा, समाज जागृतीतून ठेवन्याचे आवाहन गव्हाणे करतात.मनोज जरांगे पाटलांनी त्यांना वर बोलावून सेल्फीसुध्दा त्यांनी काढल्याचे ते सांगतात.
सायकल वारीमुळे गावोगावी शिव विचार पोहचतो,पर्यावरन संरक्षण होते,बिज रोपन पावसाळा पुर्वतयारीत ते रायगड पायथा(पाचाड) येथे करीत असतात.गड स्वच्छता मोहिम आणि प्लास्टिक मुक्तीसाठी त्यांचा सतत आग्रह असतो.आपघाताच्या कटू आठवनीतून हा सायकलस्वार योध्दा थांबला नाही काळजीपुर्वक झालेल्या चुकांची दुरुस्ती करत बिकट वहिवाट सुलभ करत शिवसंकल्पाचा वसा अविरत पुढील पिढीला देत आहे.
*अशा सायकल योध्द्याला पुढील प्रवासास मनपुर्वक शुभेच्छा!*
